
मुंबईसह कोकणात ‘शक्ती’ चक्रीवादळाचा (Cyclone Shakti) धोका – नागरिकांसाठी दिल्या महत्वाच्या सूचना.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ चक्री वादळामुळे (Cyclone shakti) महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर तसेच मुंबई, ठाणे आणि रायगडसारख्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारत हवामान विभागाने (IMD) या चक्रवाताबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला असून, ४ ते ६ ऑक्टोबरदरम्यान तुफानी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
शक्ती चक्री वादळाची सद्य स्थिती
‘शक्ती’ चक्री वादळ सध्या अरबी समुद्रात 450 किमी पश्चिम-दक्षिण पश्चिमेला सक्रिय आहे.
पुढील २४-४८ तासांत तो ईशान्य दिशेने सरकत महाराष्ट्र किनारपट्टीच्या अधिक जवळ येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
वादळी वारे ६५ किमी/ताशीपर्यंत झोडपून काढण्याची शक्यता असून, समुद्र खवळलेला असेल.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी eKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे
महाराष्ट्रातील कुठले भाग प्रभावित होणार आहेत
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे संभाव्य प्रभावाच्या कक्षेत असून, येथे पावसामुळे शहरात पाणी साचणे, वाहतूक ठप्प होणे व विद्युत पुरवठ्यावर परिणाम होणे अशी स्थिती उद्भवू शकते.
प्रशासनाची तयारी काय?
BMC (मुंबई महापालिका) आणि इतर जिल्हा प्रशासनांनी आपत्कालीन यंत्रणा तात्काळ सज्ज ठेवल्या आहेत.
NDRF च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, निचऱ्याच्या भागांमध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
शाळा, महाविद्यालये ५ ऑक्टोबर रोजी बंद ठेवण्याचा निर्णय काही जिल्ह्यांमध्ये घेतला गेला आहे.
समुद्र किनाऱ्यावर मच्छिमारांना आणि पर्यटकांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.
नागरिकांसाठी सूचना
अनावश्यक प्रवास टाळावा.
पाण्याने भरलेले रस्ते, उघड्या वायरपासून दूर राहा.
मोबाईलमध्ये चार्जिंग व इंटरनेटचा बॅकअप ठेवा.
सरकारी अलर्ट व बातम्यांचे सातत्याने निरीक्षण करा.
गरज असल्यास आपत्कालीन हेल्पलाईनशी संपर्क साधा.
तुमच्या शहरामध्ये किती पाऊस पडणार हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करावे